Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
19.5 C
New York
Tuesday, June 17, 2025

मोदींच्या नेतृत्वात देश महासत्तेच्या दिशेने.. बजेट’वर खा.सुजय विखे यांची प्रतिक्रिया

दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्म मधील शेवटच्या (अंतरिम)बजेट वर भाजप खा.सुजय विखे यांनी प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या मोदी सरकारचा आजचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा दाखवणारा आहे, अशी प्रतिक्रिया खा.विखे यांनी दिली आहे.

काय म्हणाले खा.सुजय विखे..

- Advertisement -

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या मोदी सरकारचा आजचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा दाखवणारा आहे. आज वेगाने नव्या उंचीवर जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारतातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला दिलेले प्राधान्य जनसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असून देशाच्या सर्वांगिण विकासाला प्रगतीमान बनवेल.”

-खासदार सुजय विखे पाटील

- Advertisement -

अंतरिम बजेट मधील काही ठळक मुद्दे..
*पीएम किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना लाभ
-प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सीतारमन यांनी यावेळ दिली. स्वावलंबी तेलबिया अभियानाला बळ दिले जाईल. या अंतर्गत नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला चालना दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

*भारतात करदात्यांची संख्या 2.4 पटीने वाढली
-प्रत्यक्ष कर संकलन 10 वर्षांत तीन पटीने वाढले आहे. करदात्यांची संख्या 2.4 पट वाढली आहे. देशाच्या विकासात करदात्यांच्या योगदानाचा उपयोग होत आहे. आम्ही करदात्यांची प्रशंसा करतो. सरकारने कराचे दर कमी केले आहेत. लागू करण्यात आलेल्या नवीन कर योजनेअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. कॉर्पोरेट टॅक्सही कमी करण्यात आला आहे. नवीन फॉर्म 26AS सह कर भरणे सोपे झाले आहे. 2013-14 मध्ये 93 दिवसांऐवजी आता 10 दिवसात परतावा दिला जात आहे

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा