Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.3 C
New York
Monday, August 25, 2025

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि कायदेतज्ञ म्हणाले आजचा निकाल असेल..

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आजची ताजी प्रतिक्रिया:
-सगळ्यांना न्याय मिळेल.. कायद्याला धरून संविधानात दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारावर तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या प्रिन्सिपल सेट केले आहेत त्या नुसार निकाल असेल.. 10 व्या शेड्युल नुसार निकाल असला तरी शेड्युल 10 मधील अनेक कंगोर्यांना गोष्टींना अजून तपासले गेले नाही, या सर्व कंगोर्यांची तपासणी करत येणारा निकाल असेल.. निकाल बेंचमार्क असेल..

जेष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम म्हणाले..
-दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. लोकशाही राज्यासाठी 10 वे शेड्युल आहे. सत्ताकरणात घोडेबाजार नकोय हा उद्देश सफल झालाय का हे पण पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षा कडे निकाल देणे योग्य आहे. आता अध्यक्ष काय निकाल देतात हे पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने बरेच डायरेक्शन अगोदरच दिले आहेत. त्याशिवाय अध्यक्षां समोर सुनावणी झाली असल्याने त्यांच्या समोर आलेल्या साक्षी आणि पुरावे याचाही प्रभाव निकालमध्ये असू शकतो. आज येणारा निकाल महत्वाचा असेल.

घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले..
-विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधणे हेच नैतिकतेला धरून नाही. अनेक संकेत पाळले गेले नाहीत.. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला रिजनेबल टाईमचा दुरुपयोग झालाय, निकालाला 8 महिने लागणे हे योग्य नाही. 10 वे शेड्युल फुलप्रूफ नाही ते बळकट करणे गरजेचे. यानिमित्ताने ही एक मोठी संधी होती. मात्र 10 वे शेड्युल बळकट करणे त्यात दुरुस्ती करणे हे संसदेचे काम आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा