विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आजची ताजी प्रतिक्रिया:
-सगळ्यांना न्याय मिळेल.. कायद्याला धरून संविधानात दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारावर तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या प्रिन्सिपल सेट केले आहेत त्या नुसार निकाल असेल.. 10 व्या शेड्युल नुसार निकाल असला तरी शेड्युल 10 मधील अनेक कंगोर्यांना गोष्टींना अजून तपासले गेले नाही, या सर्व कंगोर्यांची तपासणी करत येणारा निकाल असेल.. निकाल बेंचमार्क असेल..
जेष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम म्हणाले..
-दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. लोकशाही राज्यासाठी 10 वे शेड्युल आहे. सत्ताकरणात घोडेबाजार नकोय हा उद्देश सफल झालाय का हे पण पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षा कडे निकाल देणे योग्य आहे. आता अध्यक्ष काय निकाल देतात हे पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने बरेच डायरेक्शन अगोदरच दिले आहेत. त्याशिवाय अध्यक्षां समोर सुनावणी झाली असल्याने त्यांच्या समोर आलेल्या साक्षी आणि पुरावे याचाही प्रभाव निकालमध्ये असू शकतो. आज येणारा निकाल महत्वाचा असेल.
घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले..
-विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधणे हेच नैतिकतेला धरून नाही. अनेक संकेत पाळले गेले नाहीत.. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला रिजनेबल टाईमचा दुरुपयोग झालाय, निकालाला 8 महिने लागणे हे योग्य नाही. 10 वे शेड्युल फुलप्रूफ नाही ते बळकट करणे गरजेचे. यानिमित्ताने ही एक मोठी संधी होती. मात्र 10 वे शेड्युल बळकट करणे त्यात दुरुस्ती करणे हे संसदेचे काम आहे.