Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
16.7 C
New York
Friday, October 10, 2025

सत्तासंघर्षाच्या निकाला अगोदर संजय राऊत यांनी केला मोठा आरोप!!म्हणाले हे तर..

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन मूळ शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभी फूट पडली. जवळपास 40 शिवसेना आमदार शिंदेंसोबत गेले. यात सुरुवातीला गेलेले 16 आमदारांवर पक्षांतर्गत कायद्यानुसार अपत्रता तसेंच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या 14 आमदारांवर त्याच पद्धतीने अपात्रता यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत.

हा निकाल आज बुधवारी दुपारी 4 वाजता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर मोठा गंभीर आरोप केला आहे. नार्वेकर जो निकाल देणार आहेत तो “मॅच फिक्सिंग”चा असणार आहे असा मोठा आरोप खा.राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. राऊत यांच्या आरोपांमुळे खळबळ उडणार आहे. मॅच फिक्सिंग नुसार निर्णय झाल्यास आम्हांला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जात निकालाआधी झालेल्या गाठीभेटी, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे निकाल असताना आयोजित केलेले दौरे याची माहिती न्यायालयाच्या पटलावर आणावी लागेल असे राऊत म्हणाले.

आज लागणारा निकाल दिल्लीतून फिक्स झाला असून त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारीला मुंबई दौरा आयोजित केला असावा. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डाओस दौराही घोषित झाला आहे. याचाच अर्थ निकाल काय लागणार हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे लागणारा निकाल हा दिल्लीतून फिक्स झाला असून याला मॅच फिक्सिंग’च म्हणावी लागेल असे सांगत खा. राऊत यांनी हे घटनाबाह्य सरकार असल्याचा पुनरुच्चार केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा