Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
19.7 C
New York
Monday, August 25, 2025

“जुन्नर” धर्तीवर राहुरी तालुक्यात बिबट उपाययोजनांचे आदेश द्या..-मा.खा.तनपुरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी..

नगर:
राहुरी तालुक्यातील बिबटांची वाढती संख्या व त्यांचेकडून होत असलेली मानवहानी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

पत्रात तनपुरे यांनी, राहुरी तालुक्यात सद्यस्थितीत २५० पेक्षा अधिक बिबट अस्तित्वात आहेत. एक मादि बिबट एका वर्षामध्ये किमान तीन पिलांना जन्म देत असल्यामुळे बिबटांच्या संख्येत प्रत्येक वर्षी लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये बिबटांकडून मानवांवर तसेच पशुधनावर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये मानव तसेच पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यांमध्ये मानवी मृत्यु झालेले असून परिणामी वन विभागास नुकसानीपोटी लक्षावधी रूपयांची आर्थिक मदत संबंधीतांना द्यावी लागली आहे. यासाठी तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्र निश्चीत करणे तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बिबटांचे निर्बीजीकरण करणे व त्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांचे अन्यत्र स्थलांतर करणे आवश्यक आहे. कृपया जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आवश्यक उपायोजना करण्यासाठी आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे राहुरी तालुक्यातील बिबटांबाबत आवश्यक उपायोजना करण्यासाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत अशी विनंती प्रसाद तनपुरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा