जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
गेल्या पाच वर्षात आ रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात जलसंधारणाच्या केलेल्या विविध कामांचा परिणाम आता दिसून आला असून पहिल्याच पावसात नदी खोलीकरण,बंधारे खोलीकरण, ओढे रुंदीकरण,पाझर तलावातील गाळ काढणे अशा विविध कामांमुळे नदीवरी बांधारे, ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. जामखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे नांदणी नदीवरील ३४ बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतीपिकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.
यापुर्वी चांगला पाऊस होऊनही विहीरीची पाणीपातळी वाढत नसे. कारण जमिनीत पाणीच अडवले जात नसल्यामुळे पाणी पातळी उंचावत नव्हती म्हणून विहीर, बोरवेलला पाणी येत नव्हते. आ. रोहित पवार यांनी ही कामे केल्यापासून पहिल्याच पावसात विहिरीच्या पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली. नान्नज मंडळ या सर्कलमध्ये रोहित पवार यांनी स्वःखर्चातून तसेच शासकीय निधी, कर्जत-जामखेड एकात्मिक संस्था, सकाळ रिलिफ फंड, नाम फाऊंडेशन, भारत फोर्स आदी संस्थेच्या माध्यमातून नांदणी नदी, मांजरा नदीवरील बंधाऱ्यांचं खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलं तसेच या भागातील नाल्या-ओढ्यात साचलेला गाळ, वाळू, मुरूम काढून टाकण्यात आला. त्याचा परिणाम या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे नदीवरी बंधारे, ओढे, नाले, लहान-मोठे तलाव ओसंडून वाहत आहेत. जलसंधारणाची कामे केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत झाली आहे.
पाच वर्षे केलेल्या कामांचे फळ!!
-शेतीसाठीचं पाणी ही कर्जत जामखेड मतदारसंघाची मुळ समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून मी काम करत आहे. या कामासाठी मी वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणला आणि अनेक कामे मार्गी लावली. त्याचेच हे नयनरम्य दृश्य आज मला दिसतेय. हे काम बघून माझ्यासाठी या कामाचे सार्थक झाले असे मी समजतो.
-रोहित पवार, आमदार कर्जत-जामखेड