Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
11.8 C
New York
Friday, October 10, 2025

फक्त पोपटपंची करून निवडणूक जिंकता येत नाही..भाजपचे तुषार वैद्य यांचा लंकेंना टोला

शेवगाव तालुक्यात सुजय विखे यांना लाखाचे मताधिक्य देणार..

शेवगाव:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसर्‍यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना विजय करण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाचे  तालुका  अध्यक्ष तुषार वैद्य यांनी केले.

आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार नरेंद्र घुले, यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदार संघातून एक लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास वैद्य यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना सर्वांधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांची असल्याने त्यासाठी सर्वानी  प्रयत्न करण्याचे त्यांनी सुचित केले.

पारनेर विधानसभेचा लेखाजोखा घेऊन निलेश लंके यांनी मतदारसंघात यावे अन्यथा फक्त पोपटपंची करून निवडणूक जिंकता येत नाही हे लक्षात ठेवावे.स्वाभिमान संवाद यात्रा हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी काढलेली यात्रा असून,त्यांच्याकडे सांगायला कोणतेही काम नाही.त्यामुळे खा.विखे यांच्यावर  केवळ व्यक्तिगत टिका सुरू केल्याची टिका वैद्य यांनी केली.

- Advertisement -

मागील पाच वर्षात खा.विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचा निधी आणून विकास काम केली.कोव्हीड संकटातही जनते करीता त्यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला.विखे पाटील परीवाराची सामाजिक बांधिलकी मोठी  असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराने कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी मतदार संघातील सूज्ञ जनता त्याला थारा देणार नाही असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा