Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
26.4 C
New York
Monday, August 25, 2025

कुणाच्या आशिर्वादाने एलसीबी’चे बदली झालेले कर्मचारी कार्यमुक्त नाहीत??

स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांचे बदली होऊन कार्यमुक्त न केल्याने पो.नि.आहेरे यांची चौकशीचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश!!

नगर:
अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे 17 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यांना कार्यमुक्त ना केल्यानेस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी तक्रार केली होती त्याची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक यांना चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करणेबाबत आदेश केले आहे
अहमदनगर, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांनी
पोलीस कर्मचारी दर्जाचे एकूण ९२५ व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते चालक पोलीस शिपाई दर्जाचे
एकूण ५९ असे संदर्भ आदेशान्वये दि.३०/०४/२०२३ रोजी बदल्या करण्यात आलेले आहे.अहमदनगर
स्थानिक गुन्हे शाखेतील एकूण ३१ पोलीस कर्मचा-यांचे बदल्या करण्यात आलेले आहे. याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे शेख यांनी दि.०६/०४/२०२३ रोजी सविस्तर माहितीचे निवेदन व्दारे तक्रार केली होती. ज्या कर्मचा-यांना ६ वर्षे
पुर्ण झालेले आहे.व आस्थापना सुचिवर मंजुर पदांपेक्षा अधिक कर्मचारी नेमणूकीस ठेवण्यात आलेले
आहे.विद्यामान पोलीस अधीक्षक यांचे जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांच्या परवानगीने ३१ पोलीसकर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आलेले आहे.परंतु एकही कर्मचा-यांची नेमणुक स्थानिक गुन्हे शाखेतकरण्यात आलेली नाही.परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेरे यांनी ३१ कर्मचारीपैकी १७कर्मचा-यांना एक वर्षे उलटूनहि कार्यमुक्त करण्यात आलेले नाही व त्या कर्मचा-यांना जिल्हापोलीस आस्थापना मंडळाने मुदतवाढ हि दिलेली नाही. असे असताना वरीष्ठांच्या आदेशाचे अवमान करुन
सदर कर्मचा-यास स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवलेले आहे. त्याचबरोबर अनेक कर्मचारी सायबर पोलीस
ठाणे अहमदनगर येथे कामाचे सोय साठी दाखवून स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे.सायबर पोलीस ठाणे हे
संपुर्ण पणे स्वतंत्र्य असून ते स्थानिक गुन्हे शाखे अंतर्गत येत नसताना हि पोलीस अधीक्षक यांनीत्यांच्याकडील आदेश क्र.कक्ष-१(१)/असि-आस्था/बदली नेमणूक/४९४६/२०२३
दि.०३/०४/२०२३ च्या आदेशान्वये सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे पोलीस निरीक्षक पदावरुनस्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे नवीन नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु त्यांच्याकडे सायबर पोलीस
ठाण्याचे अतिरिक्त कामकाज सुध्दा देण्यात आलेले आहे. सदर ची बाब संयुक्तीक नसून त्याचे कारण सायबर
पोलीस ठाणे येथे स्वतत्र पोलीस निरिक्षक पद मंजुर असताना त्या ठिकाणी नवीन अधिकारीची नेमणूककरण्यात आलेले नाही. पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्ष उपलब्धअसताना किंवा इतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक उपलब्ध असून हि नवीन अधिकारीची नेमणूक न करता
श्री. आहेरे यांच्या कडे गेल्या १ वर्षापासून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा
अहमदनगर च्या आस्थापना सुचिवर २ पोलीस निरीक्षक पद मंजुर असताना १ पोलीस निरीक्षक पद भरण्यात
आलेले आहे.सदरचे पद भरण्याबाबत शेख यांनी दि.२२/०८/२०२१ पासून पाठपुरावा करीत आहे. परंतु आज पर्यंत
त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली नाही. अहमदनगर जिल्हा हे क्षेत्रफळामध्ये मोठा असून सदर
जिल्हयामध्ये एकूण १४ तालुके आहे. ७ महसूल विभाग आहे. या बाबी विचार करता २ पोलीस निरीक्षकनेमणूक करणे आवश्यक असताना ते नेमणूक करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अनेक कर्मचारी हे सायबर
पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखेत येथे नेमणूक नसताना कामाच्या सोयीसाठी त्या कर्मचारींना सायबर
पोलीस ठाणे येथे तपासकामी तात्पुरत्या स्वरुपात सलग्न नेमणूक करण्यात आलेली आहे. तत्पुरती बदली हेमहाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश २०१४ व २०१५ च्या तरतुदी प्रमाणे तत्पुरती बदली चा एक भाग
आहे.अशी नेमणूक करावयाची असल्यास वरीष्ठ पोलीस आस्थापना मंडळाची पुर्व परवानगी घेणे आवश्यक
आहे.तशी परवानगी न घेता पोलीस अधीक्षक यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात सदर नेमणूक केलेली
आहे. सदरची बाब हि नियमाच्या विरोधात आहे. त्याबाबत शेख यांनी पोलीस महासंचालक. विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती व स्थानिक वेळ शाखेत अजून एक पोलीस निरीक्षक नेमणूक करावी सायबर पोलीस ठाण्यामध्येही स्वातंत्र्य पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी श्री.  आहेरे यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात शिस्तभागाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती  त्या तक्रारीची विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दखल घेऊन पोलीस अधीक्षक यांना सदरची बाब गंभीर स्वरूपाचे असून चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी चौकशीअहवाल सात दिवसात सादर करण्याबाबत निर्देश केलेले आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा