Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
9.5 C
New York
Thursday, October 9, 2025

घरात नवरा अन मतदारसंघात आमदार… गुलाबरावांनी टोचले कान

जळगाव: येत्या 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालावर शिंदे गटाचं आणि राज्य सरकारचं भवितव्य ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर नुसतेच आमदार अपात्र होणार नाहीत तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा ताबा मिळण्याचा उद्धव ठाकरे गटाचा मार्ग मोकळा होणार आहे. तर, शिंदे गटाचे आमदार पात्र ठरल्यास उद्धव ठाकरे यांच्या हातून कायमचा पक्ष आणि चिन्ह जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार आहेत. येत्या 10 तारखेला त्यांचा निकाल लागणार आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट उत्तर देत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता युद्धाची तयारी सुरू झाली असून यावेळी मोठमोठ्या वावड्या उठवल्या जात आहेत. कुणी काय सांगत तर कुणी काय सांगतं? येत्या 10 तारखेला आमचं काय होईल? 10 तारखेला.. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो.. ते काय होत आम्ही बघून घेऊ, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा