पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवून ताकत दाखवून देणारच!!
दौंड यांच्या उमेदवारीने शेवंगाव-पाथर्डीत परिवर्तनाची पहाट!!
विद्यमान भाजप आमदार अडचणीत येण्याची शक्यता!!
अहिल्यानगर:
शेवंगाव-पाथर्डी मतदार संघात गेल्या अनेक दशकांत काही विशिष्ट घराण्याची मक्तेदारी सत्तास्थानात दिसून येत असल्याचा आरोप भाजपचे मूळ एकनिष्ठ कार्यकर्ते, पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुलभाऊ दौंड यांनी करत शेवंगाव-पाथर्डी मतदारसंघात निर्माण झालेल्या सरंजामशाही, एकाधीरशाही मुळे विकासाला खीळ बसली असल्याचे सातत्यानेम्हंटले आहे. यातून मूळचा स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेला एकनिष्ठ आणि मूळचा भाजपचा कार्यकर्ता नाराज होत दूर चालल्याचे चित्र मतदारसंघात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गोकुळभाऊ दौंड यांनी विधानसभा निवडणुकी साठी शेवंगाव-पाथर्डी विधानसभा मतदातसंघातून रणशिंग फुंकले आहे.
दौंड तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवंगाव आणि पाथर्डीत घेतलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून गोकुळभाऊ दौंड यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे अश्वासीत केले आहे. या अनुषंगाने दौंड यांनी भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे. आ. मोनिकताई राजळे या २०१४ आणि २०१९ ला सलगपणे निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे रखडल्याचा विरोधकांचा आरोप असून जनतेत असलेल्या नाराजीचा फटका त्यांना यंदा बसू शकतो अशी चर्चा केवळ नागरिकांतच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यां अंतर्गत सुरू असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे मतदारसंघात अव्होरात्र २४ तास जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना हात घालून वाचा फोडणारे गोकुळभाऊ दौंड यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असतानाच दौंड यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धारच केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार दौंड यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असून मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे विश्वसनीय माहिती आहे. तसे झाल्यास स्व.गोपीनाथ मुंडे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले आणि पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले गोकुळभाऊ दौंड हे विद्यमान भाजप आ. मोनिका राजळे यांना पराभवाचा दणका देणार असा विश्वास कार्यकर्त्यांत आणि जनतेतुन बोलला जात आहे. गोकुळभाऊंच्या उमेदवारीच्या निमित्ताने मतदारसंघात परिवर्तनाची अपेक्षा असून शेवंगाव-पाथर्डीचा रखडलेल्या विकासाचा मार्ग मोकळा होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
शेवंगाव-पाथर्डीचा राजकीय इतिहास पाहिला तर काही एका घराण्यांच्याच पायाशी सत्ता पिंगा घालत आली असून यातून या घराण्यात एकाधीरशाहीने जोर पकडून सामान्य एकनिष्ठ आणि मूळचा कार्यकर्ता या वृत्तीने दूर लोटला आहे. नव्याने आलेल्या हौश्या-गवश्यांना महत्व प्राप्त झाले असल्याचे बोलले जाते. मात्र यातून मतदारसंघातील सर्व सत्ता हाती असतानाही विकासाची कामेच ठप्प होत शेतकरी, शिक्षित युवा निराश आणि हताश झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे पाटपाण्याचे प्रश्न, विविध गावांच्या पाणी योजना, युवा वर्गाला एमआयडीसी अभावी रोजगाराचा अभाव, खराब रस्ते, विद्युत पुरवठ्यात सातत्याने अडचणी यामुळे जनता मेटाकुटीला आली असून जनतेला आता बदल हवा असून गोकुळभाऊ दौंड यांच्या कडे मतदारसंघाचे नेतृत्व गेल्यास निर्माण झालेले प्रश्न लवकर मार्गी लागतील अशी आशा असल्याने आता दौंड यांनीही प्रस्थापितां विरोधात दंड थोपटले असून आरपार लढाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. अभी नही तो कभी नही या त्वेषाने एक तर पक्षाने उमेदवारी दिल्यास पक्षाकडून अन्यथा अपक्ष उमेदवारी करायचीच असा निर्णय गोकुळभाऊ दौंड यांनी घेतला आहे.