मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने मॅगो ब्लड डोनेशन कॅम्प २०२४ संपन्न
पाच हजार रक्त पिशव्यांचे संकलन..
नगर:
समाजामध्ये आपण काम करीत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हास्तरावर मॅगो ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करीत आपले कर्तव्य पार पडत असतात विचार हा सकारात्मक असला पाहिजे, त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात, रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचला जातो, नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येत असतात यावेळी रक्ताची आवश्यकता पडते या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल, नगर मोबाईल असोसिएशनचे सामाजिक कार्य राज्यस्तरावर असून त्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे कै.भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प 2024 चे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, माजी उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, संजय चोपडा, विकी जगताप आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा रक्तदान शिबिराचा उपक्रम सकारात्मक आहे, जिल्हाभरातील मोबाईल व्यावसायिक एकत्र येऊन समाजासाठी आरोग्यदायी उपक्रम राबवत युवकांमध्ये ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे असे ते म्हणाले
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
चौकट:
-अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित मॅगो ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रक्तदान करत सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन दिले. रक्तदान करण्यासाठी शहरातील सर्व रक्तपिढ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये मोबाईल व्यावसायिक, ग्राहक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जवळपास ५ हजार रक्त पिशव्यांचे संकलन झाले अशी माहिती अजित जगताप यांनी दिली.