Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
18.5 C
New York
Saturday, June 14, 2025

नगरकरांचे नगरकरांशी रक्ताचे नाते!! आ.संग्राम जगताप यांचे आवाहन..

नगर:
नगर शहरातील नंदनवन लॉन्स या ठिकाणी आज मंगळवारी मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने हजारोच्या संख्येने रक्तदाते या ठिकाणी येत रक्तदानाचे पवित्र काम करत असल्याचे दिसून येतेय. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन अर्थात एमरा या सामाजिक उद्देशातून कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने आयोजित मेगा ब्लड डोनेशन कॅम्प साठी नगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी मोठा पुढाकार घेतला आहे.या मेघा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी आय लव नगर यासह शहरातील विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे करत सहभाग घेतला आहे. शहरातील नंदनवन लॉन्स(मंगलकार्यालय) या ठिकाणी मंगळवारी सकाळपासूनच शेकडोच्या संख्येने रक्तदात्यांनी आपली उपस्थिती दाखवत रक्तदानाच्या महान कार्यात सहभाग नोंदविला.त्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रम साठी जिल्हाधिकारी सालीमठ जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विशेष पुढाकार घेतलेला आहे. याबाबत त्यांनी सांगितले की एमराच्या माध्यमातून 2022 ला नगर शहरात मोठा ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आला होता. त्याच पद्धतीने आज नगर शहरांमध्ये मेघा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजन करण्यात आलेला आहे. नागरिकांनी विशेष करून नगर शहरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन नगरकरांशी असलेले आपलं नातं जोडावे असे भावनिक आवाहन केलेले आहे.अपघात झाल्यानंतर रुग्णाला आवश्यक असलेली रक्ताची गरज ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. याचा अनेकांना अनुभव येतो आणि त्यामुळेच कुणालाही ऐनवेळी आपत्कालीन परिस्थिती रक्ताचा रक्ताची गरज वाटल्यास त्यात अडचण येऊ नये यासाठी नागरिकांनी रक्तदान केले पाहिजे. यासाठी आमदार जगताप यांनी रक्तदात्यांना पुढे येण्याचा आवाहन केलं आहे. सुरू असलेल्या महा रक्तदान शिबिरामध्ये शेकडेच्या संख्येने रक्तदाते आज उपस्थित असलेले दिसून येत असून अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा