Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
16.6 C
New York
Monday, June 16, 2025

केंद्र सरकारचा कांद्या बाबत मोठा निर्णय.. तब्बल इतका हजार टन कांदा निर्यातीस परवानगी..

दिल्ली:
केंद्र सरकारने आज मोठा निर्णय आज कांदा निर्यात बंदी बाबत एक मोठा निर्णय घेतला असून तब्बल 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे यामुळे कांदा  उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

यापूर्वीच गुजरात मधील  2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली होती त्यानंतर आज शनिवारी केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यात परवानगी दिलेली आहे

हा निर्यात होणारा कांदा श्रीलंका, बांगलादेश, भूतान, बहारीन, मॉरिशस, यूएई या देशात निर्यात केला जाणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारने  कांद्यावर निर्यात बंदी लादली होती त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे नाराजी होते

- Advertisement -

मध्यंतरी अहमदनगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे तसेच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कांदा बंदी उठवण्याची मागणी केली होती यावेळी त्यांनी लवकरच यावर निर्णय होईल असे आश्वासन दिले होते

दरम्यान निवडणुका घोषित झाल्यानंतर हा विषय काहीसा बाजूला पडला मात्र दरम्यान शेतकऱ्यांमध्ये कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे प्रचंड नाराजी दिसून येत होती या पार्श्वभूमीवर कालच केंद्र सरकारने गुजरात मधील 2000 मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली तर आज शनिवारी 99,150 मॅट्रिक टन कांद्याला आता परवानगी दिली आहे यामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येणार आहे

- Advertisement -

दरम्यान केंद्र सरकारने या कांदा निर्यात बंदीच्या परवानगी उशिरा केल्याची विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येत असतानाच सत्तेतील महायुती कडून देर आहे दुरुस्त आये असे म्हणत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मात्र एकूणच आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार असल्याने याचा निश्चितच आर्थिक फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार याबद्दल वाद नाही. या अनुषंगाने शेतकरी वर्गामध्ये केंद्र सरकारच्या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा