Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
15.6 C
New York
Monday, June 16, 2025

लोकसभा निवडणुका नंतर उरलेसुरले लोकंही ठाकरेंना सोडून जातील..-राधाकृष्ण विखे

नगर(प्रतिनिधी):
ज्यांना आपले पक्ष आणि आमदार सांभाळता आले नाहीत असे लोक आघाड्या करून लोकसभा निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहत आहेत. मात्र विरोधकांच्या समोर कुठलाही ठोस कार्यक्रम दिसत नाही. केवळ इंडिया आघाडीच्या नाममात्र बैठका सुरू आहेत. दुसरीकडे राज्यामध्ये महायुती लोकसभेसाठी सज्ज असल्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारमधील सर्व घटक पक्षांचा आज रविवारी  जिल्हास्तरीय मेळाव्याचे राज्यभर आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये महायुती मधील शिवसेना एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, प्रहार जनशक्ती पक्ष आदी घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले आहे.

राज्यात सरकारमध्ये असलेल्या महायुतीच्या वतीने नगर मध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात  पालकमंत्री विखे यांनी विरोधी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राज्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार पक्ष सोडून निघून गेले. आता यांचे पक्ष केवळ नाममात्र राहिले असून त्यांची इंडिया आघाडी आता लोकसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला केंद्र आणि राज्य सरकारने जनविकासाची अनेक कामे केलेली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला ऊर्जा लाभलेले नेतृत्व आहे. आज युवाशक्तीसाठी त्यांनी विशेष कार्यक्रम घोषित केलेला आहे. शेतकरी, उद्योग, कामगार, युवा आदीसाठी अनेक योजना देत जनतेला सहाय्य करण्याची भूमिका सरकारची आहे. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर ठळकपणे नेणे गरजेचे आहे. सरकारची सकारात्मक बाजू जनतेसमोर नेणे हे महायुती कार्यकर्त्यांसमोर आव्हान असून त्याद्वारे जनतेशी संपर्क वाढवणे गरजेचे असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले. लोकसभा निवडणुकी नंतर आघाडीमध्ये राहिलेले उरलेसुरले पण उद्धव ठाकरेंना सोडून जातील असा टोला विखे यांनी भाषणात लगावला.

- Advertisement -

अहमदनगर शहरातमध्ये  आयोजित महायुती जिल्हा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. खासदार सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि विठ्ठलराव लंघे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद भैय्या गंधे, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा