Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
16.9 C
New York
Tuesday, October 7, 2025

“स्क्रिप्टेड”चा आरोप करणाऱ्या पवार साहेबांनी महाराष्ट्रात जे काही घडवून आणले.. सुजय विखेंनी दिले प्रत्युत्तर

नगर(प्रतिनिधी):
आमदार अपात्रता निर्णयाला सर्व काही स्क्रिप्टेड असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. याला आता भाजप खा.सुजय विखे यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा सखोल अभ्यास करून सुनावणीत सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला आहे. जवळपास सव्वा तास त्यांनी निकालाचे वाचन केले. इतिहासात इतक्या प्रदीर्घ काळ कुठल्याही अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. त्यामुळे अध्यक्षांचे अभिनंदन केले पाहिजे. लोकशाहीत ज्याला आक्षेप असेल त्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. मात्र विनाकारण आरोप करण्याची सवय विरोधकांना आहे असे खा.विखे म्हणाले.

महाराष्ट्रात जे काय घडलं त्याला काय म्हणणार..
-शरद पवार यांनी अध्यक्ष नार्वेकर यांच्या निर्णयाला “स्क्रिप्टेड” म्हणत टीका केली होती. त्यावर खा.सुजय विखे यांनी कदाचित त्यांनाही ही स्क्रीप्ट अगोदरच मिळाली असेल असे म्हणत महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्व पवार साहेबांनीच घडवून आणले असे लोकं म्हणतात. त्यांनी लिहलेल्या स्क्रिप्ट नुसारच त्यावेळी सर्व काही घडले असे म्हणले जाते, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना काही अर्थ नसतो., असा टोला खा.विखे यांनी लगावला. लागलेला निकाल अगदी स्वागतार्ह आहे अशी पुष्टी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

संजय राऊतांना प्रतिटोला!!
-शिवसेना उबाठा गटाचे खा.संजय राऊत यांनीही मॅच फिक्सिंगच्या केलेल्या आरोपावर बोलताना खा.विखे यांनी त्यांना मॅच फिक्सिंगचा अनुभव असावा असे म्हणत 2019 ला निकाल लागण्या अगोदरच त्यांनी राष्ट्रवादी बरोबर फिक्सिंग केले होते असे म्हणत राउतांवर पलटवार केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा