Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
18.3 C
New York
Monday, June 16, 2025

नागवडे दांपत्याचे ठरलंय.. घेतली स्पष्ट भूमिका!! यासाठी घेतली अजितदादांची भेट..

श्रीगोंदा(प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले असतानाच त्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेसाठी काँग्रेसच्या नागवडे दांपत्याने याबाबत स्पष्ट शब्दात सूतोवाच करतानाच महाविकास आघाडीतून काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा इतर पर्याय खुले असून निवडणूक लढवणारच अशी घोषणाच करून टाकली आहे. नागवडेंच्या या स्पष्ट भूमिकेमुळे मविआ नेत्यांच्यापूढे आता उमेदवारीची पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे आणि जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनुराधा नागवडे या दांपत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

नागवडे दांपत्य ‘एक्शन’मोड वर!!
-2014 चा अपवाद वगळता श्रीगोंदा विधानसभेचे प्रतिनिधित्व जेष्ठनेते बबनराव पाचपुते यांनी केले आहे. तत्पूर्वी दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांनी तालुक्याचे नेतृत्व विधानसभेत केलेले आहे. मात्र, शरद पवार हेच माझे विठ्ठल म्हणणाऱ्या पाचपुते 2019 ला  भाजप कडून आमदार झाले. 2014 विधानसभेला भाजपात गेलेल्या पाचपुतेंचा राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांनी धक्कादायक पराभव केला. राहुल जगतापांच्या विजयात काँग्रेसचे दिवंगत शिवाजी नागवडे यांचा मोठा हातभार राहिला तो शरद पवार यांच्यामुळे. बापूंना दिलेला शब्द शरद पवार यांनी पाळत त्यांना साखर महासंघाचे अध्यक्षपद दिले. मात्र या तडजोडीत नागवडे तालुक्याच्या राजकारणात मागे पडले.  मात्र आता आ.पाचपुते, माजी आ.राहुल जगताप यांच्या समोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणारच असे घोषित केल्याने महाविकास आघाडीसमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.

पाचपुते परिवारही पूर्ण तयारीत..
-काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा असलेल्या अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. एकाच घरात काँग्रेस पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष पद असताना नागवडे दांपत्य काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्यास बंडाच्या तयारीत आहे. या परस्थितीत भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे तब्येतीच्या कारणास्तव आपले पुत्र  विक्रम पाचपुते किंवा पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. गेली पन्नासवर्षं राजकारणात असून मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली असल्याने  भाजप कडून पुन्हा उमेदवारी मिळेल असा विश्वास बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राहुल जगताप पुन्हा मैदानात..
-अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणारच असे घोषित केले आहे. श्रीगोंदयाची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असून माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. 2019 ला त्यांनी उमेदवारी नाकारली होती, मात्र आता आपण पूर्ण तयारीत असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशात काँग्रेस कडून नागवडे परिवारात जेष्ठनेते बाळासाहेब थोरात कॉग्रेस कडे जागा खेचून आणणार का हा मोठा प्रश्न आहे. मात्र नागवडे यांना काँग्रेस कडून उमेदवारी धूसर वाटत असल्याने अनुराधा नागवडे यांनी वेळ आल्यास अपक्ष किंवा इतर पर्याय निवडू पण विधानसभा लढवणारच असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे येत्या 19 जानेवारी रोजी माजी आमदार दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांचा जयंती कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याने नागवडेंच्या समोर असलेल्या पर्यायातला एक पर्याय राष्ट्रवादी अजित पवार गट असू शकतो असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर नागवडे दांपत्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांच्या  जयंती कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. त्यांच्या या निमंत्रण भेटीचे फोटो समाज माध्यमातून झळकले असून यावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पवार कुटुंबाशी आमचे स्नेहपूर्ण संबंध:
-स्वर्गीय बापूंचे राजकारण आणि समाजकारणाच्या निमित्ताने अनेक नेत्यांशी जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. कारखान्याच्या गाळप कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक नेते दरवर्षी येत असतात. यात कुठलाही राजकीय हेतू नसतो. अजित दादांशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. स्वर्गीय बापूं बद्दल पवार कुटुंबाची स्नेहभावना पारिवारिक आहे. त्यामुळे जयंती सोहळ्यास त्यांना निमंत्रण दिलेले आहे.
-अनुराधा राजेंद्र नागवडे.

- Advertisement -

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा