Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
18.3 C
New York
Monday, June 16, 2025

लोकसभा निकालावर सुजय विखे कोर्टात!! निलेश लंकेंनी “कॉन्फिडेंटली”च सांगितले..

निवडणुकीत हरवलेलं आहेच, कोर्टातही तेच होईल!! -खासदार निलेश लंके

नगर:
२०२४ ची नगर दक्षिणेची लोकसभा निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली की दिग्गज विखे कुटुंबातील विद्यमान खासदार सुजय यांच्या विरोधात उभे थकलेले निलेश लंके यांच्या उमेदवारी अगदी अटीतटीच्या झालेल्या या लढतीत निलेश लंके यांनी 29000 मतांवर आघाडी सुजय विखे यांचा दारुण पराभव केला.

या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने विविध प्रकारचे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप एकमेकांनी केले गेले. आता निकालानंतर सुजय विखे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून निवडणूक प्रचारात अनेक गैरमार्गांचा अवलंब विजयी उमेदवाराने केला असल्याने घोषित केलेला निकाल रद्द करावा या मागणीची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

- Advertisement -

यापूर्वीच जवळपास चाळीसच्यावर मतदान केंद्रावरील पुनर्मतमोजणीची मागणी सुजय विखे यांनी केली असून ती मान्य करण्यात आलेली आहे. या संदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असल्याचे समजते आहे. तसेच निकाल घोषणेनंतर ४५ दिवसांच्या आत एखादा उमेदवार निकाला बाबत काही आक्षेप-शंका असल्यास याबाबत न्यायालयाच्या माध्यमातून घोषित निकाल रद्द करण्याची मागणी करू शकतो. त्या अनुषंगाने सुजय विखे यांनी उच्च न्यायालयात घोषित निकाल विरोधात याचिका दाखल केल्याने खासदार निलेश लंके यांनीही त्यांना एका जाहीर निवेदनाद्वारे प्रतिउत्तर दिले आहे.

माजी खा.सुजय विखे यांनी याचिका दाखल केल्यानंतर आता खा.निलेश लंके यांच्या कडून एक निवेदन जारी करण्यात आले असून, त्यात “निवडणुकीत हरवलेलं आहेच, कोर्टातही तेच होईल” असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काय आहे खा.लंके यांचे निवेदन..
: “संसदीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी निवडत असतात. या प्रक्रियेत कुणाचा तरी पराभव झाला होणार हे निश्चित आहे. पण आपण आपला पराभवच होऊ शकत नाही अशी मानसिकता बाळगणे ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे.या मानसिकतेतूच समोरचे पराभूत उमेदवार कधी निवडणूक आयोग तर कधी हायकोर्टात जाताना दिसत आहेत. अर्थात हे त्यांना कायद्याने उपलब्ध करुन दिलेले मार्ग आहेत. या मार्ग तपासून जर त्यांना मनःशांती लाभत असेल तर त्यांना जे काय करायचं करु द्या. आपली बाजू सत्याची आहे आणि सत्यमेव जयते म्हणजे अखेर विजय सत्याचाच होतो हे ते कदाचित विसरलेले असावेत. ते सध्या खेळ खेळायचा प्रयत्न करीत आहेत पण आपणही जिगरबाज खेळाडू आहोत. निवडणूक झाली, विरोध संपला. विधायक मार्गाने आपण सर्वजण जनहितासाठी पुढे जाऊ हि आपली भूमिका आहे पण त्यांना खेळच करायचा असेल तर आपणही व्यवस्थितपणे खेळू. निवडणुकीत हरवलेलं आहेच, कोर्टातही तेच होईल. *खासदार निलेश लंके*”

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा