Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
16.9 C
New York
Tuesday, October 7, 2025

हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरणारे निलेश लंकेंवर विजय औटींचा नौटंकीचा आरोप

गदा नाचवली म्हणून कोणी पैलवान होत नाही..औटींनी खोचक टीकेसह उपस्थित केले अनेक प्रश्न!!

नगर:
हनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणा-या निलेश लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात मंदिर बंद असताना गप्‍प का बसले होते? असा सवाल पारनेर नगर प‍ंचायतीचे माजी नगराध्‍यक्ष विजय औटी यांनी उपस्थित केला.

या संदर्भात प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात विजय औटी यांनी म्‍हटले आहे की, ज्‍या महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात कोव्‍हीड संकटात जाणीवपुर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्‍या भावनांशी खेळ केला गेला तेव्‍हा निलेश लंके शब्‍दानेही बोलले नाहीत. कोव्‍हीड सेंटरमध्‍ये किर्तनाचे कार्यक्रम घेणारे लंके मंदिर उघडावेत म्‍हणून आग्रही का राहीले नाहीत?

- Advertisement -

हनुमान चालीसा म्‍हटली म्‍हणून आ.राणा दांम्‍पत्‍यांना जेलमध्‍ये टाकेले तेव्‍हा लंके यांची हनुमान भक्‍ती कुठे गेली होती. पालघर मध्‍ये दोन साधुंची हत्‍या झाली तेव्‍हाही लंके काही बोलले असे आठवत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांच्‍या अस्तित्‍वावर कोर्टात प्रश्‍न उपस्थित करणा-या कॉग्रेस पक्षाचे पाठबळ घेवून लंके आज उमेदवारी करतात. लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्‍याची भूमिका महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना मान्‍य आहे का? असा प्रश्‍नाही विजय औटी यांनी उपस्थित केला.

हनुमान जयंतीचा मुहूर्त पाहुन अर्ज दाखल करण्‍याची लंके यांची नौंटकी ही केवळ सहानुभूती निळविण्‍यासाठी असली तरी, त्‍यांच्‍या नौंटकीला समाज भुलनार नाही. गदा नाचवली म्‍हणून कोणी पहीलवान होत नाही असा टोला लगावतानाच महाविकास आघडीचा जनाधार संपल्‍यामुळेच आता देव देवतांची आठवण होवू लागील असल्‍याचे औटी यांनी आपल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा