Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.3 C
New York
Monday, August 25, 2025

देशात दहा जागा लढविणारी “तुतारी” परिवर्तन कसे करणार??? -विनायक देशमुख

नगर:
“लोकसभेत बहुमतासाठी किमान २७२ जागा आवश्यक असतात. संपुर्ण देशभरात केवळ १० जागा लढविणारया राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) पक्षाचे ‘परिवर्तनाचे आवाहन’ म्हणजे मतदारांची दिशाभुल करण्याचा प्रकार आहे, ” अशी टीका भाजपाचे नेते विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केले.

नगरच्या गांधी मैदानात महाविकास आघाडीची प्रचार सभा झाली. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ व अनुभवी नेते उपस्थित होते. त्यामध्ये १० जागा लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे , १८ जागा लढविणारया शिवसेना (उबाठा) चे व उत्तर महाराष्ट्रात केवळ एक जागा लढविणारया काॅन्ग्रेस पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते.लोकसभेच्या एकुण ५४३ जागांपैकी बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता असते, याची या मंडळींना संपुर्ण जाणीव असताना “देशात परिवर्तनासाठी आम्हाला निवडून द्या.”,असे आवाहन करुन त्यांनी एक प्रकारे मतदारांची दिशाभूलच केली आहे.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्ष २३० जागांवर तर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी,आप ऄआयडिएमके असे अन्य प्रादेशिक पक्ष प्रत्येकी ३०/४० जागांवर निवडणूक लढवित असुन एकमेव भारतीय जनता पक्ष ४५० पेक्षा जास्त जागा लढवित आहे. त्यामुळे इंडि आघाडीतील पक्ष सत्तेवर येण्यासाठी नव्हे तर फक्त नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठीच निवडणूक लढवित असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते.

- Advertisement -

एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कणखर व एकमुखी नेतृत्व तर दुसरीकडे ‘आपला समन्वयक ही ज्यांना लवकर निवडता आला नाही ” अशी विस्कळीत इंडि आघाडी,असे चित्र आहे. अशावेळी मतदारांनी प्रादेशिक पक्षांच्या भुलथापांना बळी न पडता  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वाला मतदान करावे,व पाच दहा जागा लढविणारया पक्षाला मतदान करुन आपले मत वाया घालवू नये ,” असे आवाहन विनायकराव देशमुख यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा