Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
19.5 C
New York
Tuesday, June 17, 2025

साखर,डाळ वाटप प्रकरणी विखे पितापुत्रांची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंद करावी

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केली असून त्यांची ग्रीनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी अशी खोचक टीका आमदार नीलेश लंके यांनी जामखेड येथील दौऱ्यामध्ये केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विखे पिता – पुत्र सत्त्- ोत असताना त्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाही. अपयश झाकण्यासाठी विखे पाटील पिता पुत्राने महसूल विभगात भ्रष्टाचार करून डाळ साखर वाटली असल्याचा हल्लाबोल लंके यांनी केला.

निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा जामखेडतालुक्यातील विविध गावांमध्ये दाखल झाले असून यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह जामखेड तालुक्यातील खर्डा, नायगांव ; राजुरी ; नान्नज ; चोडी ; जवळा पोतेवाडी यांच्यासह अनेक वाड्या वस्त्यावरील जनतेशी जाऊन संपर्क साधला. यावेळी लंके म्हणाले की महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या वतीने जो साखर आणि डाळीचा पुरवठा केला जातो तो पुरवठा यांनी दाबला असल्याचा आरोपही केला आहे. तर साखरही प्रवारा कारखान्याची असून कारखान्याची अवस्था तुम्ही काय केली हे सर्वांना माहीत आहे. तर दुसरीकडे आमदार
खासदारांची कामे काय असतात हे जनतेला माहीत असून सार्वजनिक व वैयक्तिक योजना राबविणची जबाबदारी आमदार खासदारांकडे असते. खासदार सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षात कोणतेही काम न करता साखर डाळ वाटली  अशी खोचक टीका निलेश लंके यांनी केली आहे.

आमदार रोहित पवारम्हणाले की विविध योजना व अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फक्त पिळवणूक करण्याचे काम हे सरकार करत असुन भारतीय जनता ; पार्टी ; अजित दादा पवार व आमदार राम शिंदे यांचा चांगलाचं समाचार घेतला . अशा सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी आवाहन केले.
तसेच पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नांना आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले .
या जनसंवाद यात्रेच्या सभेसाठी बहुसंखेने नागरिक उपस्थित होते .

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा